Monday, February 7, 2022
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौदावा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय तेरावा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय तेरावा
दक्षयज्ञाचा विध्वंस,त्रिपुरदहन,शिवपार्वती विवाह,स्कंदाचा जन्म,तारकासुराचा वध.
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा
श्रवणरहस्य,बहूलेचा उध्दार, भस्मासूर वध.
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा
रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य. भद्रसेन आख्यान.
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहावा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहावा
शारदाख्यान
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय नववा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय नववा
ब्रह्मराक्षस,ब्राह्मण आणि शबर दांपत्याचा उद्धार.
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय आठवा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय आठवा
भद्रायू आख्यान
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय सातवा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय सातवा
सुमेधा,सोमवंत.मदन व पिंगला,सुमती आणि भद्रायू कथा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय सहावा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय सहावा
सीमंतिनी आख्यान.
श्री गणेशाय
नमः।
सूत म्हणतात
– सोमवार, प्रदोष आणि महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा निश्चित उद्धार होतो.
आर्यावर्ताचा
राजा चित्रवर्मा हा सत्वशील, पराक्रमी आणि पुण्यवान होता. तो हरिहरांची मन:पूर्वक भक्ती
करीत असे. त्याने भगवान शंकराला अनेक नवस केले, आणि त्यांच्या कृपेने त्याला एक अत्यंत
रूपवती, गुणवती आणि शुभलक्षणी कन्या झाली – तिचे नाव ठेवले सीमंतिनी. सीमंतिनी
म्हणजे सौंदर्याची परिसीमा.
कन्येच्या
पत्रिकेनुसार, तिच्या चौदाव्या वर्षी वैधव्ययोग होता. मात्र, शिवकृपेने तो टळू शकेल,
असे एका ब्राह्मण ज्योतिषीने सांगितले.
दिवसागणिक सीमंतिनी मोठी होत गेली, तसेच राजाची चिंता वाढत गेली.
एका दिवशी
ती आपल्या सख्यांसोबत गप्पा मारत असताना, एका सखीने तिच्या भविष्यातील वैधव्ययोगाबद्दल
सांगितले. हे ऐकून सीमंतिनी हादरून गेली. तिने मार्गदर्शनासाठी ऋषी याज्ञवल्क्य यांची
पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली आणि आपले भविष्य कथन केले.
मैत्रेयीने
तिला सोमवार व्रताची संपूर्ण माहिती आणि विधी समजावून सांगितले. सीमंतिनीने निष्ठेने
सोमवार व्रत सुरू केले.
पुढे तिचा
विवाह नैषध देशाच्या राजा इंद्रसेन याच्या पुत्र चित्रांगद याच्याशी ठरला. दोन्ही बाजूंनी आनंदोत्सव झाला. सीमंतिनी
व्रत अत्यंत भक्तिभावाने करत राहिली. ती दर आठवड्याला १,१०० दाम्पत्यांचे पूजन करायची
आणि व्रतात कसलीही त्रुटी राहू नये म्हणून विशेष काळजी घ्यायची.
विवाहप्रसंगी
इंद्रसेनाने अपार दानधर्म केला. सीमंतिनी सासरी गेल्यानंतरही तिची शिवभक्ती अखंड चालूच
होती. लग्नानंतरचे दिवस अत्यंत आनंदात गेले.
दिवाळीच्या
निमित्ताने चित्रवर्म्याने आपल्या कन्येला व जामाताला सन्मानपूर्वक आमंत्रित केले.
एका दिवशी चित्रांगद शिकारीसाठी गेला असता, यमुनेच्या तीरावर त्याला एक सुंदर नौका
दिसली. तो नौकेत बसला, पण काही वेळातच ती उलटली आणि तो यमुनेत बुडाला. अनेक प्रयत्न
करूनही तो सापडला नाही.
हे ऐकून
सीमंतिनी शोकाकुल झाली. संपूर्ण राजपरिवार जमिनीवर लोळत रडत होता. इंद्रसेनला ही बातमी
समजताच तो पत्नीसमवेत त्वरेने आर्यावर्तात आला. आणि पुढे शोकात बुडालेला राजदाम्पत्य
नैषधला परतले.
त्यांच्या
अनुपस्थितीत, इंद्रसेनच्या नातलगांनी राज्य बळकावले आणि त्यांना नगरातच बंदी करून टाकले.
या प्रसंगाने सीमंतिनी अत्यंत दु:खी झाली, परंतु तिने सोमवार व्रत थांबवले नाही. ती
अहोरात्र शिवनामस्मरण करू लागली. अशी तीन वर्षे लोटली.
दरम्यान,
यमुनेत बुडालेला चित्रांगद नागलोकात पोहोचला. तक्षक नागराजाने त्याची विचारपूस केली.
चित्रांगदाने आपली कथा सांगितली आणि आपण शिवभक्त असल्याचे नमूद केले. हे ऐकून तक्षक
अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याचे आदरातिथ्य केले.
चित्रांगद
घरी जाण्याची परवानगी मागतो. नागराज त्याला अपार भेटवस्तू, बारा हजार हत्तींचे बळ,
एक वेगवान अश्व, तेजस्वी रत्ने, एक राक्षसगण आणि मार्गदर्शक म्हणून सर्पसेवक देतो.
तसेच, संकटकाळी मदतीचे आश्वासनही देतो.
चित्रांगद
अश्वारूढ होऊन यमुनेच्या प्रवाहातून वर येतो. त्याच वेळी सीमंतिनी स्नानासाठी तिथे
आली होती. दोघांनी एकमेकांना ओळखले नाही. चित्रांगद तिच्याशी संवाद साधतो. सीमंतिनी
आपली दु:खगाथा सांगते. तिचे अश्रू आणि पीडा ऐकून चित्रांगदही रडतो.
तो तिला
आपला खरा स्वरूप सिद्धपुरुष म्हणून न सांगता, तीन दिवसांत पतीस भेट घडवण्याचे आश्वासन
देतो आणि तिला गोष्ट गुप्त ठेवण्यास सांगतो. सीमंतिनी सुखावते.
चित्रांगद
नैषध देशात पोहोचतो. सर्पसेवक मनुष्य रूप धारण करून नगरात प्रवेश करतो व राज्यावर कब्जा
केलेल्यांना सांगतो की चित्रांगद पाताळातून परत आला असून त्याच्याकडे तक्षक नागराजाची
मैत्री व मोठे सैन्यबळ आहे.
हे ऐकताच,
शत्रूंना धडकी भरते. त्यांनी इंद्रसेन आणि लावण्यवतीला मुक्त करून पुन्हा राज्यावर
बसवले. इंद्रसेन पुत्रभेटीस निघतो. चित्रांगद पित्याच्या पायांना मिठी मारतो. ही वार्ता
ऐकून देशोदेशीचे राजे भेटवस्तू घेऊन आले.
आर्यावर्तात
परतल्यावर सीमंतिनीने अकरा लक्ष दाम्पत्यांची पूजा केली, अकरा लक्ष बिल्वपत्र शंकराला
अर्पण केली आणि अकरा लक्ष दीप लावले. तिच्या भक्तीचे सर्वत्र कौतुक झाले. इंद्रसेन
व लावण्यवतीने तिला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. चित्रांगदाने चित्रवर्म्यास दुर्लभ भेटवस्तू
दिल्या.
काही काळाने
चित्रवर्म्याने राज्य चित्रांगदाला सोपवले व तपश्चर्येसाठी अरण्यात गेला. पुढे त्याने
शिवकृपेने शिवलोक प्राप्त केला. चित्रांगद व सीमंतिनी यांना आठ पुत्र झाले – सर्व आज्ञाधारक,
सद्वर्तनशील आणि पराक्रमी. चित्रांगदाने न्याय व नीतीने राज्य केल्याने त्याची कीर्ती
दूरदूर पसरली. सीमंतिनीची शिवनिष्ठा अखंड राहिली आणि तिची कीर्तीही सर्वत्र झाली.
फलश्रुती:
ही कथा ज्या स्त्रिया भक्तिभावाने ऐकतील किंवा वाचतील, त्यांचे सौभाग्य वृद्धिंगत होईल.
दूर गेलेला पती परत येईल. विधवा स्त्रियांनीही ही शिवभक्ती जरूर करावी. संपूर्ण निष्ठेने
सोमवार व्रत करावे.
।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु
।।
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पाचवा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पाचवा
धर्मगुप्त आख्यान
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौथा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौथा
विमर्शन व कुमुद्वती,चंद्रसेन व श्रीकर.
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...
-
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय नववा ब्रह्मराक्षस,ब्राह्मण आणि शबर दांपत्याचा उद्धार. श्रीगणेशाय नमः।...
-
श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा श्रवणरहस्य,बहूलेचा उध्दार, ...